Thursday, August 30, 2012

मी माझ्या अपघातानंतर दिवाळी २००२ पासुन पिगासस ला पोहायला जातोय . माझे आसामचे काम सुरु झाले व त्यात खंड पडला .परंतु हया १० वर्षात "एकमेका पाहू पाण्यात "  हा एक छान ग्रुप मात्र तयार झाला .आठवले काका दोन वर्षांपुर्वी फेब्रुवारी २०१० ला गेले .  मी पुण्याला आलो कि सकाळी तलावावर सर्वानां भेटायला असतो .महिन्यात येणारे वाढदिवस जवळील एका तारखेस  आम्ही सर्वजण मिळुन साजरे करतो . वयोगट ३४ ते ८० .बहुतेक सर्वजण  स्वतःच्या  उद्योग धंद्यात वा व्यवसायात .बाहेर हॉटेल मधे त्यानिमित्त वारंवार जाणारे .अप्रुप नसलेले .भेटणे महत्वाचे खाणे नाही ह्यातील .माझ्यासारखे न घेणारे असताना खाण्याबरोबर पिणेही होतेच .आमच्या पैकी बहुतेक एकाचेही काका मामा वा बाकी वडिलधरया नी कधीही  दारूला स्पर्श ही केला नसेल किंबहूना ह्या विचाराने सुध्दा त्यांना घेरी आली असती .मग हे का होत आहे? खोटी सामाजिक प्रतिष्ठा , युरोप अमेरिकेतील समाज जीवनाचे अनुकरण .कष्ट, शिस्त, वेळेचे व्यवस्थापन,श्रमाची प्रतिष्ठा यांना बगळा देवुन नाकोती गोष्ट आपण अंगिकारत आहोत .आपली संस्कृती ही सण साजरे करून ,व्रते उद्यापने करून नाही टिकत .ती आतुन रहावी लागते हे खरे .पोट भरल्यावर दिवान खान्यात गप्पा मारणे सोपे आहे .मुल्ये रुजवणे कठीण आहे .     

No comments: